22 दिसंबर 2020

ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय?

ऍसिडिटी होणे म्हणजे खूप नॉर्मल बाब आहे. जेव्हा पोटातील जठरासंबंधी ग्रंथींद्वारे असिडच्या अत्यधिक उत्पादन होते तेव्हा ऍसिडिटी होते. ही समस्या सामान्यत छातीत जळजळ म्हणून ओळखली जाते.
 पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो जो आपण खाल्लेल्या अन्नाचे पतन आणि पचन यासाठी आवश्यक असतो आणि शरीरासाठी नुकसानदाई जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंधित करतो.
*ऍसिडिटीची कारणे:* मानसिक ताण, जास्त तेलकट, मसालेदार आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन, गर्भधारणा, धूम्रपान आणि मद्यपान, पोटाचे आजार, शारीरिक हालचाल आणि खाण्याच्या पद्धतीमध्ये अनियमितता या मुळे देखील ऍसिडिटी होऊ शकते. तसेच खलील औषधाने देखील ऍसिडिटी चा त्रास जाणवु शकतो👇🏼
Medicines for high blood pressure, Antibiotics, Depression and anxiety medications
लक्षणे:-
मळमळ, पोट किंवा घशात किंवा हृदयात जळजळ होणे, श्वासाची दुर्घंधी, गिळण्यात अडचण, अस्वस्थता, बद्धकोष्ठता, तोंडाला आंबट चव, अपचन अशी अनेक लक्षणे उद्भवतात.
उपाय:
नैसर्गिकरित्या ऍसिडिटी कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एक ग्लास टरबूजचा रस किंवा नारळाचे पाणी. आपण आपल्या आहारात सलाद,केळी, काकडी किंवा दही देखील समाविष्ट करू शकता. ते आम्लतेसाठी त्वरित आराम प्रदान करतात.🙂
 ऍसिडिटी वर कायम स्वरूपी उपाय पुढील पोस्टमध्ये...


अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती साठी लिंक वरून ग्रुप जॉईन करा.🙏🏽🙏🏽🙏🏽

19 दिसंबर 2020

व्हिटॅमिन K । एक महत्वाचा व्हिटॅमिन ।

 

हिरड्यातुन आणि नाकातून रक्त येणे, मासिक पाळीत जास्त रक्त जाणे, डोळ्याची समस्या, रक्तवाहिन्या कठोर होणे, अशे त्रास असतील तर तुम्हाला व्हिटॅमिन K ची कमतरता असू शकते.


 बऱ्याच लोकांना माहीत नसलेल्या महत्वाच्या व्हिटॅमिनस् पैकी हा एक व्हिटॅमिन आहे.


व्हिटॅमिन के चे फायदे -

रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि अंतर्गत रक्तस्त्राव,बिलियरी अब्स्ट्रक्शन, ऑस्टिओपोरोसिस, मासिक पाळीच्या वेदना टाळण्यासाठी व्हिटॅमिन के एक महत्त्वपूर्ण जीवनसत्व आहे. रक्तवाहिन्या कडक होऊ नये, सुधारणे आणि मूतखडा यासाठी हे महत्त्वपूर्ण जीवनसत्व आहे.

व्हिटॅमिन के आपल्या कशातून मिळते.

हिरव्या पालेभाज्या, मुळा, गहू, बार्ली, पालक, बीट, ऑलिव्ह ऑईल, लाल तिखट, केळी, अंकुरलेले धान्य, रसाळ फळे.


https://chat.whatsapp.com/L5LXjxQxoxGKrcKPH2mYVN

आरोग्य विषयक माहिती whatsapp वर मिळवण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

18 दिसंबर 2020

आपल्याला कॅल्शिअम ची कमतरता का भासते?

 कॅल्शिअम युक्त आहार घेऊन देखील आपल्या शरीरात कॅल्शिअम ची कमतरता का भासते. आपण जे अन्न घटकातून कॅल्शिअम घेतो ते शरीरात शोषण्यासाठी व्हिटॅमिन D ची आवश्यकता असते.

सूर्यप्रकाश ' डी ' जीवनसत्त्वाचे सर्वांत उत्तम प्राप्तिस्थान आहे . याशिवाय दूध, अंडी आणि अनेक माशांच्या लिव्हरमधूनही ते प्राप्त होते .


कॅल्शियम शोषणे:  एकदा मौखिकरित्या किंवा सूर्यप्रकाशाच्या प्रदर्शनातून घेतलेले व्हिटॅमिन डी नंतर व्हिटॅमिनच्या सक्रिय स्वरूपात रूपांतरित होते. आपल्या आहारातील कॅल्शियमच्या चांगल्या प्रकारे शोषणास प्रोत्साहित करणारा तो सक्रिय फॉर्म आहे.

पुरेसे व्हिटॅमिन डी शिवाय शरीर केवळ 10% ते 15% आहारातील कॅल्शियम शोषू शकते, परंतु 30% ते 40% शोषु शकते.

पॅराथायरॉईड ग्रंथीसह काम करणे: पॅराथायरॉईड ग्रंथी मूत्रपिंड, आतडे आणि हाडे  यांच्यातुन शोषण करून रक्तातील कॅल्शियमचे संतुलन राखून ठेवते. कॅल्शियम सेवन अपर्याप्त किंवा व्हिटॅमिन डी कमी असल्यास, परथायरॉईड ग्रंथी सामान्य श्रेणीमध्ये रक्त कॅल्शियम ठेवण्यासाठी हाडामधून काढून घेते म्हणून आपली हाडे कमजोर होतात.


व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे आरोग्य काय परिणाम पडतात. हृदय रोग आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, संक्रमण आणि प्रतिरक्षा प्रणाली विकार विशेष करून वृद्ध लोकांमध्ये येते. प्रोस्टेट आणि स्तन यासारख्या काही प्रकारचे कर्करोग.

https://chat.whatsapp.com/L5LXjxQxoxGKrcKPH2mYVN


अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती मिळवण्यासाठी लिंक वरून ग्रुप जॉईन करा.🙏🏽🙏🏽🙏🏽

17 दिसंबर 2020

आयुर्वेदिक औषधाचे दुष्परिणाम असतात की नाही?

 आयुर्वेदिक औषधाचे दुष्परिणाम नसतात. हा चुकीचा समज आहे,

सध्या कोरोना वर मात करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी सगळेच आयुर्वेदाकडे वळले आहेत, पण या काढ्यातील घटकाच्या अति वापराने आता दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. तरी काढा किती व कधी याचा विचार करूनच घेईला हवा.

काढ्यातील घटकातील अति सेवनाने होणारे परिणाम 

लवंग :- अधिक रक्तस्त्राव, रक्तातील साखर पातळी कमी करते. अधिक खाण्याद्वारे, विषारी घटक शरीरात गोळा होतात, एलर्जी होऊ लागते.

 काळीमिरी :- पोटात जळजळ, पोटात दुखणे,गर्भावस्थेत शिशुला नुकसान, त्वचेवर खाज व सूज येणे, डोळ्यामध्ये जळजळ, आतड्याचे नुकसान होते,

 दालचिनी :- अति वापराने लिव्हर नुकसान पोहचते, एलर्जी होऊ शकते.

 विलायची :- रिएक्शन,गालब्लैडर स्टोन,छाती आणि घशात ताण व वेदना, श्वस घेण्यास त्रास, फुफ्फुसातील दाह.

 अद्रक :- पोटाचे विकार, सतत ढेकर येणे, ओठ आणि जिभेवर सूज येणे, उल्टी, सारख सोचास येणे व झोप न लागणे.

 हळद :- रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो, किडनी स्टोन्सचा धोकाही उद्भवू शकतो,क्वचित पित्त, पोटदुखी.

 व्हिटॅमिन C :- जीवनसत्वाचं प्रमाण जास्त झाल्यास किडनी स्टोन, पोटात जळजळ, जुलाब, पोटाच्या तक्रारी निर्माण होतात.


https://chat.whatsapp.com/DvCR4yRlwMQIH95p0BTb1F


अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती मिळवण्यासाठी वरील लिंक वरून ग्रुप जॉईन करा.🙏🏽🙏🏽🙏🏽

16 दिसंबर 2020

अनिल कपूर यांच्या तरुण दिसण्याचे रहस्य काय?

अनिल कपूर यांना एका मुलाखतीमध्ये त्यांच्या Young दिसण्याबद्दलचे रहस्य विचारले असता त्यांनी आरोग्याबद्दल खूप सारी उपयुक्त माहिती सांगितली,त्यांची ती मुलाखत काय होती ते आपण पाहू.

 'दील धड़कने दो' या आमच्या मल्टीस्टार चित्रपटाच्या शूटिंगसाठी कृझचा अर्धा भाग भाड्याने घेतला होता . क्रूझवरच खूपसं चित्रण झालं. सकाळी सात वाजता सुरू झालेलं शूटिंग संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण व्हायचं . पॅक अप झालं की संपूर्ण स्टारकास्ट दररोजच पार्टी करत असे . थोडी वाइन , अनेक विदेशी पदार्थांची रेलचेल , गप्पा - गोष्टी आणि डान्स अशी धमाल मस्ती केल्यावर तजेला येतो , असं मी सोडून प्रत्येकाचं मत होत ! मी रात्री १० वाजता माझ्या केबिनमध्ये गाढ झोपून जात असे ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच उठायचो. यावरून अनेकांनी चिडवलं, पण २ महिन्यांत माझं रुटीन कायम राहिलं, मी माझ्या शिस्तबद्ध जीवनाचा गुलाम आहे ! शिस्तबद्ध आयुष्य , वक्तशीर - नियोजनबद्ध व्यायाम हेच माझ्या फिटनेसचं रहस्य आहे . करिअरमध्ये माझ्यावर अनेकदा टीका झाली . पण मी टीका- नकारात्मकतेपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवलं आहे . कारण *मन चंगा तो तन चंगा*! माझा तसा काही आगळा - वेगळा फिटनेस मंत्र नाही . पण माझी जीवनशैल मात्र नियमित आहे . मी ती काटेकोरपणे पाळतो . सकाळी ६ वाजता उठण्याचा माझा अनेक वर्षांचा परिपाठ आहे . सकाळी उठून मी १ लिटर पाणी पितो आणि १ केळी खातो अगदी दररोज, न चुकता. मग व्यायाम सुरू करतो. कधी योगासने , कधी आऊट डोअर व्यायाम , कधी जिम अशा प्रकारे व्यायामातही बदल आणल्याने मी कंटाळत नाही. त्यात सातत्य असतं.
 ब्रेकफास्टमध्ये सँडविच विथ व्हेजीस्- सॅलडची पाने, विविध सॉस, लेट्युस, एग व्हाइट, कधी ओट्स मिल, नाचणी लापशी, कधी मिल्क सीरियल्स तर कधी दलियाही असतात. दुपारच्या जेवणामध्ये बहुधा उकडलेल्या भाज्या खातो . ब्रोकोलीला विशेष पसंती असते माझी. सलाड असतात. आणि त्याआधी सूप मस्ट. शक्यतो मी भात आहारात घेत नाही,पण अधूनमधून ब्राऊन राइस आणि ३-४ डाळी उकडून केलेली डाळ त्यावर लिंबू हा मेनू मला आवडतो . कारण तो रुचकर आणि आरोग्यदायी आहे. रात्रीचे जेवण मी सात ते आठदरम्यान घेतो. ते असते सूप आणि सॅलड्सचे. आणि मी १० वाजता झोपण्यास जातो. अर्थात झोपण्यापूर्वी एक गोष्ट मी आवर्जून करतो ते म्हणजे रोजच्या आहारात मी किती कॅलरीज घेतल्या हे मी पाहतोच. जास्त घेणे जसे चुकीचे तसे कमी घेणेही. सामोसा, भजीसारखे तेलकट पदार्थ तर मी कित्येक वर्षात खाल्लेही नाहीत.

 https://chat.whatsapp.com/CEBc4ScPFSk23bpnXJFEJ7 अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती दररोज whats app वर मिळवण्यासाठी वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.🙏

23 फ़रवरी 2020

तणावमुक्त जीवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली

तणाव मुक्त जीवन आनंदी जीवन


या धावपळीच्या व धक्काबुक्कीच्या युगात ताणतणाव ही एक मोठी समस्या झाली आहे. मानसिक तणाव घेतल्याने त्याचे शरीराला खूप मोठे दुष्परिणाम सोसावे लागतात.जास्त ताणतणाव घेतल्याने आपल्याला कोणत्या समस्या उद्भवू शकतात व त्यावर उपाय काय हे आपण पाहू.

तनाव कशामुळे येतो व त्याची कारणे-
 तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, ह्रदयासंबंधी लेख, लठ्ठपणा, अॅसिडीटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात.

अस्वस्थता, डोकेदुखी, अपस्मार, नाडीची गती वाढणं, छातीत दुखणं, हृदयविकार, श्‍वासाला अडथळा आल्यासारखं वाटणं किंवा श्वास जोरात चालणं, उच्च रक्‍तदाब, जिभेला कोरड पडणं, अपचन, अॅसिडिटी, मूत्राशयावरील नियंत्रण कमी होणं, कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढणे, पाठदुखी, पोटदुखी, उलटी होण्याची भावना, कंबरदुखी, हातापायांना गोळे येणं, रोग प्रतिकारकशक्‍ती कमी होणे आदी समस्या उद्धभतात.

तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. शिवाय यामुळे आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.

तणाव दूर करण्यासाठी काही सोपे उपाय -

1.रोज सकाळी व्यायाम व योग करावा.
डिप्रेशन पासून दूर राहण्यासाठी स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवणे फार गरजेचे आहे.व्यायाम ही शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारी एक नैसर्गिक अॅन्टीडिप्रेस्टंट क्रिया आहे.संशोधनात काही लोकांना त्यांच्या आवडीनूसार आठ आठवडे अॅरोबिक्स व्यायाम व नॉन-अॅरोबिक्स व्यायाम आठवड्यातून तीनदा करण्यास सांगण्यात आले.यामुळे त्या लोकांचे डिप्रेशनचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाल्याचे आढळले
2.  8-15 दिवसातून एक तरी सुट्टी घ्यावी.
3.आपल्याला जमेल तेवढेच काम करावे.
4.काम करण्याची पद्धत बदलावी. काम आनंद घेऊन करावे.
5.कुटुंब व लहान मुले यांच्याबरोबर थोडा वेळ घालवावा.
6.रोज सकाळी 20-25 मिनिट चालावे.
7.देवावर श्रद्धा ठेवल्यानेही मानसिक ताण कमी होतो.
8.सकाळी लिंबू सरबत, गुलकंद वैगैरे व रात्री झोपण्याच्या आधी अविपटीकार चूर्ण सेवन करावे.
9.सकाळी ध्यान करावे.
10.नेहमी डोकं शांत ठेवून काम करावे.



आमच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
        https://arogyaniti.blogspot.com